Wednesday, 29 October 2014

नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनच्या कार्यशाळेचे उद्घाटन

नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनच्या
कार्यशाळेचे उद्घाटन
  नागपूर- समोर दिसणाऱ्या प्रसंगाकडे संवेदनशीलतेने पहात तो क्षण कॅमेरात कैद करण्याचे माध्यम म्हणजे फोटोग्राफी. त्यामुळे या क्षेत्रात स्वतःचे नाव कमवायचे असेल, तर संवेदनशीलता, कल्पकता आणि संयम ही त्रीसूत्री बाळगणे गरजेचे असते. हे गूण नसतील तर प्रकाश किरणांच्या या कलेत स्वतःचे स्थान निर्माण करता येऊ शकणार नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ छायाचित्रकार अरविंद पुरंदरे यांनी बुधवारी येथे मार्गदर्शन केले.
निमित्त होते धरमपेठ कॉमर्स कॉलेजमध्ये सुरू असलेल्या पाच दिवसीय कार्यशाळेचे. छायाचित्रणाच्या क्षेत्रात आवड असणाऱ्यांना तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळावे यासाठी नागपूर प्रेसफोटोग्राफर्स असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ ऑफ नागपूर ऑरेंज सिटी, आरएस मुंडले धरमपेठ आर्ट्स अॅँड कॉमर्स कॉलेजच्या संयुक्त सहकार्याने ही संधी उपलब्ध करून देण्यात आली. शाळकरी मुलांपासून ते सेवानिवृत्तांपर्यंत सर्वच वयोगटातील ६० हून अधिकजणांनी तन्मयतेने कार्यशाळेस उपस्थिती नोंदविली.
कार्यशाळेचे पहिले पुष्प गुंफताना फोटोग्राफीच्या कलेविषयीचे तंत्र अत्यंत सोप्या शब्दांत उलगडत पुरंदरे म्हणाले, ही नुसती कला नाही तर एकाच वेळी स्वतःशी आणि जगाशी साधलेला दुहेरी संवाद आहे. शब्दांना जिथे मर्यादा पडतात त्या भावना एक फोटो बोलू शकतो, इतकी या कलेत क्षमता आहे. त्यामुळे कोणताही क्षम कॅमेरात कैद करण्यापूर्वी प्रत्येकाने हातातल्या कॅमेराचा स्वभाव आणि त्याच्यातले बारकावे समजून घेणे गरजेचे आहे. जे दिसते ते टिपणे हे कॅमेराचे काम आहे. मात्र त्याला योग्य दिशा देणे हे आपले काम आहे. आवश्यक तितक्याच प्रकाश किरणांचे बोट धरून समोरचा क्षण टिपणे ही कला आहे. हे तंत्र अनुभवातून पॉलिश होते. स्वतःच्या फोटोवर तटस्थपणे टीका कराल तरच झालेल्या चुकांमधून बोध घेता येईल. सध्याच्या डिजिटलायझेनने हे तंत्र आणखी सुलभ केले आहे. प्रकाशाच्या छटांची एकदा माहिती झाली, की कोणत्या वेळी शटर स्पिड किती ठेवायची, अॅपर्चर किती असावा, डेफ्त ऑफ फिल्ड कशी मेंटेन करायची, फोकस कुठे हवा, आयएसओ किती हवा या गोष्टी आत्मसात होतील. या कलेच्या क्षेत्रात कोणीही अभिमन्यू नाही. त्यामुळे चुका होतील ही भीती दूर करा आणि आपल्याच चुकांमधून हे तंत्र अवगत करा, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
तत्पूर्वी ज्येष्ठ छायाचित्रकार विवेक रानडे यांच्याहस्ते फोटो क्लिक करून कार्यशाळेचे औपचारिक उद्घाटन केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष संदिप चटर्जी अध्यक्षस्थानी होते. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. संध्या नायर, भाजपाचे नेते देवेंद्र दस्तूरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रानडे म्हणाले, प्रत्येकात एक कलावंत दडलेला असतो. कॅमेरा हे केवळ एक टूल आहे. त्याला व्हिजन, क्रिएटिव्हिटी आणि संवेदनशीलतेची जोड द्याल, तर तुम्ही देखील उत्तम छायाचित्रकार होऊ शकता. चटर्जी म्हणाले, फोटोग्राफी म्हणजे नुसती फ्रेम नाही तर तर ती एक भाषा आहे. त्यामुळे तुम्ही जितका सराव कराल तितके हे माध्यम अधिक खुलते. प्राचार्या नायर म्हणाल्या, छायाचित्रण म्हणजे जीवनाकडे डोळसपणे पाहण्याचे माध्यम आहे. हे व्हिजन देण्यासाठी ही कार्यशाळा निश्चितपणे तुम्हाला मदत करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. नाझनिन पाटणी हीने कार्यक्रमाचे सुरख सूत्रसंचालन केले.
 समोर दिसणाऱ्या प्रसंगाकडे संवेदनशीलतेने पहात तो क्षण कॅमेरात कैद करण्याचे माध्यम म्हणजे फोटोग्राफी. त्यामुळे या क्षेत्रात स्वतःचे नाव कमवायचे असेल, तर संवेदनशीलता, कल्पकता आणि संयम ही त्रीसूत्री बाळगणे गरजेचे असते. हे गूण नसतील तर प्रकाश किरणांच्या या कलेत स्वतःचे स्थान निर्माण करता येऊ शकणार नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ छायाचित्रकार अरविंद पुरंदरे यांनी बुधवारी येथे मार्गदर्शन केले. तत्पूर्वी ज्येष्ठ छायाचित्रकार विवेक रानडे यांच्याहस्ते फोटो क्लिक करून कार्यशाळेचे औपचारिक उद्घाटन केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष संदिप चटर्जी अध्यक्षस्थानी होते. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. संध्या नायर, भाजपाचे नेते देवेंद्र दस्तूरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रानडे म्हणाले, प्रत्येकात एक कलावंत दडलेला असतो. कॅमेरा हे केवळ एक टूल आहे. त्याला व्हिजन, क्रिएटिव्हिटी आणि संवेदनशीलतेची जोड द्याल, तर तुम्ही देखील उत्तम छायाचित्रकार होऊ शकता. चटर्जी म्हणाले, फोटोग्राफी म्हणजे नुसती फ्रेम नाही तर तर ती एक भाषा आहे. त्यामुळे तुम्ही जितका सराव कराल तितके हे माध्यम अधिक खुलते. प्राचार्या नायर म्हणाल्या, छायाचित्रण म्हणजे जीवनाकडे डोळसपणे पाहण्याचे माध्यम आहे. हे व्हिजन देण्यासाठी ही कार्यशाळा निश्चितपणे तुम्हाला मदत करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. नाझनिन पाटणी हीने कार्यक्रमाचे सुरख सूत्रसंचालन केले.


 समोर दिसणाऱ्या प्रसंगाकडे संवेदनशीलतेने पहात तो क्षण कॅमेरात कैद करण्याचे माध्यम म्हणजे फोटोग्राफी. त्यामुळे या क्षेत्रात स्वतःचे नाव कमवायचे असेल, तर संवेदनशीलता, कल्पकता आणि संयम ही त्रीसूत्री बाळगणे गरजेचे असते. हे गूण नसतील तर प्रकाश किरणांच्या या कलेत स्वतःचे स्थान निर्माण करता येऊ शकणार नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ छायाचित्रकार अरविंद पुरंदरे यांनी बुधवारी येथे मार्गदर्शन केले. तत्पूर्वी ज्येष्ठ छायाचित्रकार विवेक रानडे यांच्याहस्ते फोटो क्लिक करून कार्यशाळेचे औपचारिक उद्घाटन केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष संदिप चटर्जी अध्यक्षस्थानी होते. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. संध्या नायर, भाजपाचे नेते देवेंद्र दस्तूरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रानडे म्हणाले, प्रत्येकात एक कलावंत दडलेला असतो. कॅमेरा हे केवळ एक टूल आहे. त्याला व्हिजन, क्रिएटिव्हिटी आणि संवेदनशीलतेची जोड द्याल, तर तुम्ही देखील उत्तम छायाचित्रकार होऊ शकता. चटर्जी म्हणाले, फोटोग्राफी म्हणजे नुसती फ्रेम नाही तर तर ती एक भाषा आहे. त्यामुळे तुम्ही जितका सराव कराल तितके हे माध्यम अधिक खुलते. प्राचार्या नायर म्हणाल्या, छायाचित्रण म्हणजे जीवनाकडे डोळसपणे पाहण्याचे माध्यम आहे. हे व्हिजन देण्यासाठी ही कार्यशाळा निश्चितपणे तुम्हाला मदत करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. नाझनिन पाटणी हीने कार्यक्रमाचे सुरख सूत्रसंचालन केले.




No comments:

Post a Comment